ताज्या घडामोडी

उमटे धरणाच्या गाळासंबंधी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी घेतली रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट

रायगड-अलिबाग

काल दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची घेतली भेट

अलिबाग तालुक्यात 1978 साली उमटे गावाच्या हद्दीत मातीचे उमटे धरण बांधले गेले होते या उमटे धरणातून सर्व लोकांना पाणीपुरवठा व्हायचा कालांतराने अलिबाग शहराला एमआयडीसी ने पाणीपुरवठा होऊ लागल्याने उमटे धरणातून  सुडकोली,रामराज,बोरघर,चिंचोटी,बेलोशी,चौल,रेवदंडा नागाव आणि आक्षी या ग्रामपंचायत हद्दीतील लोकांना गेली कित्येक वर्ष पाणीपुरवठा होत आहे परंतु गेल्या 46 वर्षांपूर्वी बांधले गेलेले उमटे धरण आता पूर्णपणे मातीच्या गाळाने भरलेले आहे त्याच्यामुळे नागरिकांना भर जानेवारीपासून दोन-तीन दिवस आड करून पाणी मिळत आहे 2019 साली निवडून आलेले शिवसेनेचे आणि आता सध्याचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी ते निवडून आल्यानंतर उमटे धरणातील गाळ काढणार असं त्यांच्या 2019 च्या जाहीरनाम्यात सांगितलेलं होतं परंतु त्यांचा 5 वर्षांचा कार्यकाल जवळजवळ संपत आलेला आहे परंतु त्यांनी उमटे धरणाचा गाळ काढला नाही त्याच्यामुळे काल शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी पुढाकार घेऊन तुम्हाला जर गाळ काढता येत नसेल तर मी स्वतः काढते असे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ठणकावून सांगितले

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!